Monday, November 6, 2023

The story how we stopped 8 children from migrating for sugar-cane cutting with their parents....

 Hope is a good thing, may be best of things and no good thing ever dies...

Our Fellows were very much disturbed when they got to know that almost 16 children from Chopda Anandghar are going to migrate with their parents. They brainstormed on various ideas of how we can stop this and what we should do if migration still happen.
From the next day they started having dialogue with parents to understand why they are migrating and if there is any possibility of them not going. They were constantly going to their houses to convince them to not go. Most of the people have taken advances from their Mukadam and have spent it to fulfill their daily needs and now they had no money to return. The parents understands that the migration is going to hamper the future of their children but had no answer of what they should do. They were helpless and so were we.
It took Shubham and Kalusing a week before they got the first success. The grand-mother of Ritik and Vir announced to other family members during dinner that they are not going to migrate and she is willing to face all circumstances of the decision. Her determination gave power to the other family members and in next 3 days they arranged Rs. 10000/-, the advance they had taken from the Mukadam. Ritik and Vir's father went to Mukadam, returned the advance and told him that they are not going to come.
But this is not the end. The decision of Ritik & Virs family worked as a motivation for others as well.
I am happy, thrilled, excited, overjoyed to share, to announce that this year we have successfully stopped migration of 8 children and their families. This is not a small victory.
8 children not going to the work with their parents mean 8 children saved from child-labour. This also means 8 children saved from facing abuse. This also means 8 children not dropping out of the school. This also means a ray of hope for better future for 8 families.
This also means that we were not able to stop 8 children going out with their parents. But we have not lost hopes. We had distributed worksheets, stationery and relevant study material to the children along with the numbers of Shubhal & Kalusing to stay in touch..

At Vardhishnu we believe that Every Child Matters. It is one child at a time for us. It is because of the determination, dedication and passion of our Fellows, team members which makes this possible. We face lots of adversities when we work, be it not having enough funds, not having a closed space for running Anandghar, CSRs, funding agencies not willing to break their comfort zones of staying in metros. But we have people who are highly qualified, yet they have decided to be with children in an hostile environment, we have passion, we have an unending zeal of making a change in this world. To create a better, safer, happier world for every child. Because EVERY CHILD MATTERS...EVERY CHILD COUNTS...

Copyright @ Adwait Dandwate

Monday, September 26, 2022

When your children starts their own 'Anandghar'....

Pratiksha, currently studies in 7th grade. She is the 1st batch of students of Anandghar to whom we enrolled in school in 2016. Pratiksha used to work as a waste picker along with her mother and younger brother getting enrolled in schools. She is still a regular student of Anandghar.
Anandghar runs from Monday to Friday; so she along with her friends decided to run their own Anandghar for the children from the community on every Saturday.
They started the campaign from Thursday last week. Asked each and every student of Anandghar whether they would like to join 'their' Anandghar on Saturday. Noted down names of the interested children and then on Saturday they inaugurated their Anandghar with 25+ children in the narrow lanes outside her home.
You can see Pratiksha Didi, Shalu Didi, Roshani Didi and Bhuri Didi teaching kids in this picture shared with me by Pratiksha after hugely successful 1st day.

PS. They also distributed Bananas as nutritional food just like Anandghar

Wednesday, July 13, 2022

Aditi tai was reading a story to Dadu and he just slept in her arms.

Dadu's day starts at 5 in the morning when he goes to the dumping ground. He usually comes back at 02:00 / 03:00 pm. After eating something he couldn't wait any longer to come to Anandghar. For a 8 year boy like him, it is an very exhausting job. Most of the times he is very exhausted by the time he comes to Anandghar. But he never skips the center.

Even if he decides to stay home, he does not have the luxury to take an afternoon nap.
On that day, Dadu came late to the center, he picked up a book and ask Aditi Tai to read him a story. She was reading a story to him when he just slept on her shoulders and Aditi just sat in that position for next about 20 minutes as she did not wanted to disturb him.
He is not the only one who sleeps at Anandghar. There are few other children also and they do it because they feel safe.
Incidences like this let us know that whatever we are doing is really worth doing....

Thursday, March 22, 2018

The Nigerian Witch Boy



नायजेरिया, आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला छोटासा देश. लोकसंख्या सुमारे १९ कोटी. लोकसंख्येच्या मानाने आफ्रिकेतील सगळ्यात मोठा देश. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीयांची संख्या सगळ्यात जास्त असली तरी २५० हून जास्त समूह असलेला हा देश. जगातील सगळ्यात श्रीमंत कृष्णवर्णीय व्यक्ती नायजेरीन आहे मात्र दुसरीकडे नायजेरियातील ६१%हून अधिक लोकं दारिद्र्यरेषेखाली राहतात. यांचे दैनिक उत्पन्न 1 $ हून म्हणजे ६५ रुपयांहून कमी आहे.
नायजेरियात सार्वजनिक आरोग्य सुविधांचा अत्यंत अभाव आहे. येथील लोकांचे सरासरी आयुष्य ५२ वर्षे आहे, भारताशी तुलना केल्यास भारतातील लोकांचे सरासरी आयुष्य ६९वर्षे तर अमेरिकेसारख्या देशांत हेच ७९वर्षे आहे.  नायजेरियातील साक्षरता दर हा ६०% टक्के आहे. शिक्षण, अंधश्रद्धा या अत्यंत गंभीर समस्या झाल्या आहे.
मुळची डेन्मार्कची अॅन्जा लोवन (Anja Ringgren Lovén) तिच्या नवऱ्यासोबत नायजेरियाला आली आणि लहान मुलांना वाचवण्यासाठी म्हणून त्यांच्या आफ्रिकन चिल्ड्रन एड एज्युकेशन & डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेमार्फत काम करायला सुरुवात केली. ज्यांना वाचवण्यासाठी म्हणून काम करत होती ती मुलं कोण होती? तर घरच्यांनी वाईट शक्तींनी पछाडलेला (Witch), चेटूक करणारा, असे ठरवून सोडून दिलेले, वाळीत टाकलेले हे छोटे जीव. हि चिमुरडी मुलं चेटूक करतात हा त्यांच्यावरचा आरोप. कुटुंबियांच्या वाईट आर्थिक परिस्थितीला, संकटांना मुलांनी केलेलं चेटूक कारणीभूत आहे या मानसिकतेतून नायजेरियात असंख्य मुलांना पालक सोडून देतात. जी घरात टिकतात त्यांना याच कारणाने कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडावे लागते.
एकदा का एखाद्या मुलाला / मुलीला पछाडलेल ठरवले गेले कि बाधा दूर करण्यासाठी गावातील पुजाऱ्याला किंवा एखाद्या मांत्रिकाला बोलावले जाते. एका अभ्यासानुसार नायजेरियात १९९९ पासून आजपर्यंत सुमारे १५००० मुलांना पछाडलेला (witch boy / girl) म्हणून वाळीत टाकण्यात आले आहे तर १००० हून जास्त मुलांना मारले गेले आहे.
फोटोतल्या ह्या चिमुरड्यामुलावर देखील असाच आरोप करून घरच्यांनी त्याला सोडून दिले होते. नायजेरीच्या रस्त्यांवर पडलेला कचरा खाऊन हा न जाणो किती दिवस जगत होता. अॅन्जा लोवनला तो दिसला त्यावेळी पूर्णपणे नग्नावस्थेत होता, त्याच्या हाडाचा सापळा तेवढा उरला होता. संपूर्ण शरीरावर जखमा होत्या आणि अळ्यांनी ते शरीर पोखरून काढलेलं होत. त्याला नीट उभ राहता येत नव्हत कि नीट चालता येत नव्हत.
३० जानेवारी २०१६ला अॅन्जाने या मुलाला वाचवलं. या दिवसाबद्दल अॅन्जा म्हणते, “आम्हाला फोन वर एकाने अगदी २/३ वर्षाच्या मुलाबद्दल माहिती दिली होती. एवढ लहान मुलं फार काळ रस्त्यावर एकट जगू शकत नाही म्हणून आम्ही लगेच तयारी सुरु केली. आम्ही ज्यावेळी मुलाच्या शोधात या गावात पोहोचलो तेव्हा माझ लक्ष रस्त्याच्या कडेला बसलेल्या या अगदी काही वर्षाच्या चिमुरड्याकडे गेल. मी देखील नुकतीच काही महिन्यांपूर्वी आई झाले होते पण ह्या चिमुरड्याची परिस्थिती पाहून मी हादरून गेले. ”
अॅन्जाने त्याला प्यायला पाणी दिलं, बिस्किटं दिली. ह्याच वेळी कोणीतरी हा फोटो काढला. अॅन्जाने स्वतःच्या फेसबुक प्रोफाईलवर हा फोटो शेअर केला आणि काही कालावधीतच हजारो लोकांनी त्यावर कमेंट लिहायला, तो फोटो शेअर करायला सुरुवात केली. पण अॅन्जा लोवन एवढच करून थांबली नाही. तिने  त्याला संस्थेत आणले आणि त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्याचे नाव ठेवले ‘होप’ (Hope). होपला दवाखान्यात दाखल केले गेले. डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरु केले आणि लवकरच त्याचे परिणाम दिसून येऊ लागले.
होपला मदत करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जगभरातून 10 लाख डॉलरपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. यामुळे त्याचे ऑपरेशन होऊ शकले. आज होप अॅन्जाच्या संस्थेतल्या आणखी सुमारे ६० मुलांसोबत राहतो आहे.
२०१६ साली अॅन्जा लोवनला जर्मनीतील ‘Ooom’ मॅगिझनने वर्षातील प्रेरणादायी व्यक्तीचा सन्मान दिला. हा सन्मान मिळवताना तिचे प्रतिस्पर्धी होते, दलाई लामा, पोप फ्रान्सिस आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा.
नुकतच बरोबर एका वर्षाने अॅन्जाने पुन्हा एकदा ह्या चिमुरड्यासोबतचा फोटो शेअर केला. होपला आता शाळेत जायला लागला आहे.
चेटूक करतात म्हणून लहानपणीच कुटुंबीयांनी सोडून दिलेल्या या मुलांच्या मनावर या घटनेचे सहजासहजी न मिटणारे असे तीव्र पडसाद उमटलेले असतात. ह्यातून बाहेर काढून त्यांना प्रेम देणाऱ्या होप आणि तिच्या संस्थेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
रस्त्यावर एकट्या पडलेल्या मुलांना  पाहून बहुतांश जरी नाकाला रुमाल लाऊन पुढे निघून जातात तरी काही मात्र त्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देतात....नुसते सगळेच निरोज गेस्ट नसतात......

अॅन्जा लोवन आणि तिच्या संस्थेविषयी आणखी जाणून घेण्यासाठी: https://dinnoedhjaelp.dk/en/

Sunday, March 18, 2018

The Vulture & the Girl



केविन कार्टरया जगप्रसिद्ध छायाचित्रकाराने काढलेले हे चित्र.
केविनचा जन्म साउथ आफ्रिका मधील जोहान्सबर्ग येथे १९६० साली झाला. फोटोग्राफीला सुरुवात केल्यानंतर केविनने लवकरच ‘the bang bang club’ला जॉईन केले. मुख्यतः साउथ आफ्रिकेतल्या शहरांमध्ये कृष्णवर्णीय लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचे, अन्यायाचे फोटो काढणाऱ्यांना ‘bang bang club’ या नावाने ओळखले जाई. हिंसाचार, खून, दंगलीचे फोटो काढणे हा केविनच्या कामाचा भागच होता. अनेकदा यासगळ्या त्रासापासून स्वतःला तोडून ठेवण्यासाठी तो ड्रग्जचा सहारा घेत असे. याच ‘the bang bang club’ या अंतर्गत १९९३साली सुदान येथे पडलेल्या भयंकर अश्या दुष्काळाची बातमी कव्हर करण्यासठी गेला.
तिथे आयोड या एका छोट्याश्या गावात असलेल्या एका खाद्य पुरवठा केंद्राच्या काही अंतरावर त्याने हे चित्र काढले. या चित्रात दिसत असलेले छोटसे बाळ खरतर मुलगा आहे मात्र सुरुवातील हे छायाचित्र प्रकाशीत झाले तेव्हा मात्र ती मुलगी असल्याचे अनेकांचे मत झाले आणि त्याच नावाने ते चित्र प्रसिद्ध देखील झाले.
26 मार्च १९९३च्या द न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापून आले. त्यावेळी त्याखाली लिहिले होते, ‘A little girl, weakened from hunger, collapsed recently along the trail to a feeding center in Ayod. Nearby, a vulture waited’ (भुकेने व्याकुळलेली एक मुलगी, आयोड येथे असलेल्या ‘खाद्य केंद्रावर जाताना कोसळून पडते. शेजारी एक ‘गिधाड’ प्रतीक्षेत)
काही काळातच हे छायाचित्र जगातील अनेक मासिकांत, वृत्तपत्रात छापले गेले. ह्या छायाचित्रने जगभरातील लोकांना सुदान इथल्या भयानक अश्या दुष्काळाची जाणीव करून दिले. अनेकांनी सुदानला मदत पाठवायला सुरु केली. मात्र हि बातमी छापून आल्यावर टाईम्सला अनेकांनी पत्र पाठवून त्या मुलीच काय झालं? ती वाचली कि नाही? अशी विचारणा करायला सुरुवात केली.
मात्र हे छायाचित्र काढणाऱ्या केविनला याची काहीच कल्पना नव्हती. त्याच काम झाल्यवर तो तिथून निघून आला होता. शेवटी ३०मार्चला टाईम्सने संपादकीयमध्ये याला उत्तर दिले, “अनेक लोकांनी आमच्याकडे पत्राव्दारे मागील आठवड्यात प्रकाशित झालेल्या छायाचित्रातील मुलीचे पुढे काय झाले अशी विचारणा केली. मात्र छायाचित्र काढल्यावर छायाचित्रकाराने गिधाडाला पळवून लावले व लगेच पुढे वाटचाल सुरु केली. त्यामुळे ती मुलगी केंद्रापर्यंत पोहोचली कि नाही याबद्दल त्यास माहित नाही.”
केविन कार्टरने या संपूर्ण प्रकरणाबद्दल सांगितले आहे की दिवसभर आयोडच्या केंद्रावर येणाऱ्या लोकांचे फोटो काढल्यानंतर तो गावाच्या बाजूला असलेल्या ओसाड प्रदेशावर काही फोटो काढता येतात का म्हणून एकटाच बाहेर पडला. जवळच एका लहान मुलीच्या जोरजोरात धापा टाकण्याच्या आवाजाने त्याचे त्याकडे लक्ष गेले. केंद्रावर पोहोचण्याच्या प्रयत्नासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करणारी एक छोटी चिमुरडी केंद्राच्या रस्त्यावरच कोसळली होती आणि त्याबाजूला तिच्या मृत्यूची वाट पाहत एक गिधाड. त्याने सुमारे २० मिनिटे ते गिधाड तिथून उडून जाईल याची प्रतीक्षा केली. मात्र तसे झाले नाही तेव्हा त्याने ह्याचे छायाचित्र घेतले आणि गिधाडाला पळवून लावले,  त्या चिमुरडीने तोपर्यंत अंगात जोर आणूस कशीबशी केंद्राकडे चालायला सुरुवात केली होती. मात्र केविन लगेचच तिथून निघून गेला. केविन म्हणतो,” मी सिगारेट पेटवली, आणि एका झाडाखाली बसून एकटाच तीन तास रडत होतो.”
सुदान येथील रोगांची लागवण पत्रकारांना होऊ नये यासाठी त्यांना कोणत्याही व्यक्तीला हात लावण्याची परवानगी नव्हती. मात्र अनेकांनी केविनवर त्या मुलीला मदत न केल्याबद्दल टीका केली. पीटर्सबर्ग टाईम्सने या बद्दल लिहिताना म्हणले, “ एका चिमुरडीच्या त्रासाला फोटोत कैद करण्यासाठी स्वतःच्या कॅमेराची लेन्स adjust करणारा माणूस म्हणजे त्या ठिकाणी हजर असलेलं दुसर  गिधाडच”
ह्या फोटोला मानाचा असा पुलित्झर पुरस्कार मिळाला मात्र केविन त्या मुलीचे नेमके झाले काय ह्या प्रश्नाने आता केविनला सुद्धा छळायला सुरु केली होती. शेवटी हा फोटो काढल्यानंतर सुमारे ६ महिन्यांनी केविन कार्टरने आत्महत्या केली आणि स्वतःला या त्रासातून मुक्त केले.
केविनची suicide note म्हणते...”मला निराशेने ग्रासले आहे...माझ्याकडे फोन घ्यायला, घराचे भाडे भरायला, मुलांचा सांभाळ करायला, कर्ज फेडायला पैसा नाही....मृत्यू, मृतदेह, संताप, दुखः ह्या सगळ्याच्या आठवणी मला छळायलाच लागल्या आहेत....आठवणी....जखमी, भुकेल्या चिमुरड्या मुलांच्या, पोलिसांच्या, लोकांना मारणाऱ्याच्या... मी केनला (नुकतीच मृत्यूमुखी पडलेली केविनची सहकारी) भेटायला जातो आहे..मी जर नशीबवान असेन तर कदाचित तिला भेटेनही.....”

Thursday, March 15, 2018

निरोज गेस्ट.....



परवा मी ‘निरोज् गेस्ट’ वर लिहिलेली पोस्ट अनेकांनी वाचली, शेअर केली, त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या. मला मोर्च्याच्या, आंदोलनाच्या, सरकारच्या आणि विरोधी पक्षांच्या राजकारणात जायचं नाहीये. खरतर ती पोस्ट लिहिण्या मागची अनेक कारण आहेत. सरकारची आणि समाजाची शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती असेलेली असंवेदनशीलता, समाजच स्वतःच्या आनंदात, सुखात मश्गुल असण ही जशी काही कारणं झाली तसेच दुसरे कारण म्हणजे अलका धुपकर आणि इतर पत्रकारांनी मोर्च्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या रक्ताळलेल्या पायांचे फोटो. 
वूडलॅन्ड, रिबॉक, नायकीची चार-सहा हजाराची बुट आणि सॅन्डल घालणारी आपण, घराच्या कोपऱ्यावर दुध घ्यायचं झालं तरी टू-व्हीलर आणि कार नेणारी आपण, आज किती चाललो हे मोजण्यासाठी हातात ‘smart watch’ घालणाऱ्या आणि त्यावर किती ‘calories’ burn केल्या हे बघणारी आपण, दिवसभर एसीत बसून संध्याकाळी जिम मध्ये (तीही एसी) ट्रेडमिल वर चालून, “आज मी ३ किमी चाललो बाबा!” अस कौतुकाने आणि ‘अभिमानाने’ मित्रांना सांगणाऱ्या आपल्याला भर उन्हात साधी स्लीपर घालून शेकडो मैल चालणाऱ्या शेतकऱ्यांच दुखः, त्रास, वेदना समजतील तरी कश्या?
शब्दांपेक्षा चित्रजास्त परिणामकारक असतात असे म्हणतात. मात्र काही अशी चित्र असतात जी कितीही ठरवलं तरी तुमच्या नजरेसमोरून पटकन जात नाहीत. तुमचे विचार अनेक काळ त्या चित्रांभोवती फिरत राहतात. अगदी तसचं मोर्च्यात सहभागी शेतकऱ्यांची रक्ताळलेली पाउल बघून माझ देखील झालं. त्या पाउलांनी मला अस्वस्थ केलं आणि लिहित केलं.
अनेकांना त्यात राजकारण दिसतय पण मला मात्र फक्त ती रक्ताळलेली पाउलच तेवढी दिसतायेत. अश्या अनेक छायाचित्रांनी मला कायमचं अस्वस्थ केलंय. इतिहासात अशी अनेक महत्वाची चित्र आहेत तसाच प्रत्तेक चित्राचाही काहीतरी इतिहास असतोच. दुर्दैवाने यातली अनेक चित्र ‘निरोज गेस्ट’ या संकल्पनेभोवतीच फिरतात. अशीच काही छायाचित्र आणि त्या मागचा इतिहास तुमच्या समोर पुढील काही दिवसात टप्प्या-टप्प्याने घेऊन यावं आणि आपल्यातल्या संपून चाललेल्या संवेदनशीलतेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा एवढीच इच्छा!


Saturday, May 20, 2017

आनंदघर डायरीज

हर्षल

सुरुवातीच्या मरिमाता मंदिराच्या परिसरात रिकामटेकडी लोक पत्ते खेळत बसलेली असायची. नाहीतरी पैसे लाऊन इतर खेळ सुरु असायचे, याच अंगणात आनंदघर सुरु झाले आणी चित्र पालटायला सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही तिथे बसलो तरी आम्हाला न जुमानणारी हि लोकं आता आम्ही आलोय हे दिसताच स्वतःचे सामान आवरून बाहेर पडायला लागली. पत्त्याच्या जागी आता लहान चिमुरड्याची लगबग तिथे सुरु झाली. मरिमातेचे आंगण लहान मुलांनी गजबजून जायला लागले. अश्याच एका दिवशी एक मुलगा आमच्या जवळ आला आणि “सर, उद्या पासून मी पण येऊ का?” अस आम्हाला विचारल अर्थातच आम्ही लगेच त्याला हो सांगितल. तो परत जायला निघाला तेव्हा “अरे तुझ नाव तर सांग.” अस मी त्याला विचारलं आणि तो म्हणाला, “हर्षल”.
हर्शल तेव्हा ८वीत होता. अंगकाठी अगदी बारीक. घरी तो, त्याचे आई-वडील आणि भाऊ. तिथेच जवळ त्याच्या वडिलांची भाजी-पाल्याची गाडी होती. हर्षल इतर मुलांपेक्षा खूपच वेगळा. अत्यंत हुशार. बुद्धिमत्ता तीव्र. सतत नवीन काहीतरी करण्याच्या शोधात. त्याच्या वयाच्या इतर मुलांसारखी त्याला कुठलीच व्यसन नव्हती. अत्यंत शांत. कधी कुणाशी भांडण नाही, कुणाला शिव्या देणार नाही, कुणाची खोड काढण नाही.
त्याकाळात जळगावात लोडशेडिंग सुरु होत. इतर ठिकाणी २ तास लाईट जात असेल तर तांबापुरात सकाळी २/३ तास आणि संध्याकाळी २/३ तास अशी किमान ४/६ तास वीज नसायची. सकाळच्या वेळी काही अडचण यायची नाही. पण संध्याकाळी वीज नसली कि हर्षलला अभ्यास करायला त्रास होत होता. या पठ्याने एक दिवस भंगारबाजारात जाऊन २० रुपयाचे LED लाईट, मोबाईलची बॅटरी आणली, इकडून-तिकडून काही तारा गोळ्या गेल्या आणि चक्क दिवसाचार्ज केले कि रात्री वीज गेल्यावर देखील व्यवस्थित उजेड देणारे बल्ब तयार केले. आनंदघरात येताना आम्हाला दाखवायला घेऊन आला.
त्यानंतर काही दिवसांनी गाणी ऐकायला काही नाही अस वाटल्याने परत भंगारबाजारात जाऊन थोड्या वस्तू विकत आणल्या आणि त्याचा मोबाईलच्या बॅटरीवर चालेल असा चक्क FM रेडीओ तयार केला आणि तोही फक्त ३० रुपयात. आम्हाला या पोराच प्रचंड कौतुक वाटल.
एके दिवशी हर्षल आनंदघरात आला नाही, दुसऱ्यादिवशी त्याला कुठे गेला होतास अस विचारल्यावर. “आमच्या समाजाचा कार्यक्रम होता. मग आपल्या समाजाच्या कार्यक्रमात जायला नको का?” अस त्यानेच मला प्रतिप्रश्न केला. याचाच आधार घेऊन मी आणि हर्षल बोलायला लागलो. बराच वेळ बोलल्यानंतर, अगदी शेवटी तो मला म्हणाला,”मग जर कुणी आपली जात विचारली तर काय उत्तर द्यायचं?” मी म्हणालो,”माणूस म्हणून सांग”. आणि तो विषय तिथेच संपला.
तांबापुरा परिसरात हिंदू-मुस्लीम लोकसंख्या जवळपास समान आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी इथे देखील दर काही महिन्यांनी वादाची ठिणगी पडली जाते आणि जातीय दंगली घडवून आणल्या जातात. काही दिवसानंतर अशीच एक दंगल घडली, ज्यामुळे पुढचे काही दिवस आम्हाला आनंदघर बंद ठेवावे लागले. ज्यावर नंतर चर्चा करताना मुलांनी हे कस चुकीच आहे अशी याबद्दल स्वतःहून चर्चा केली. या चर्चेत अचानक हर्षलने मला प्रश्न केला,”सर तुमची जात कुठली?” मी लगेच उत्तर दिले,”माणूस”. “ठीक आहे.” अस म्हणून हर्षलच उत्तर आला. “का रे अस काय झाल तुला विचारायला?” तर त्यावर त्याने उत्तर दिल,”नाही काही दिवसापूर्वी तुम्ही मला सांगितल होत कि जात विचारली तर माणूस म्हणून सांगाव आणि तसच वागाव. मग मी बघत होतो, आता तुम्ही काय उत्तर देता ते.” तुमच्या प्रत्तेक कृतीवर, बोलण्यावर मुलाचं अगदी बारीक लक्ष असत. अनेक बाबतीत ते तुमच अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. अश्या वेळी जर तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक वाटला तर मुल लगेच तुम्हाला तो दाखवून द्यायला कमी करत नाहीत किंवा त्यांचा तुमच्या बोलण्यावरून विश्वास उडायला लागतो, पण हेच जर तुम्ही जे बोलता तसेच वागता अस मुलांचा जाणवत तेव्हा त्यांचा तुमच्याबद्दलचा आदर, प्रेम वाढत या सर्वोत्तम प्रात्यक्षिकच त्या दिवशी मला मिळाल.
कुमार निर्माणच्या शिबिरात वर्षभरात केलेल्या कृतींची माहिती देण्याच काम देखील याचच. . या शिबिरांमध्ये मुलच कामाची माहिती देतात आणि इतर गटातली मुल त्यांना प्रश्न विचारतात. अश्याच एका शिबिरात एकाने ‘सचिन – क्रिकेटचा देव’ या विषयावर माहिती दिली. यावर हर्षलनेस सचिनला क्रिकेटचा देव का म्हणतात? असा प्रश्न केला. थोड्याच्या गोंधळात पडलेल्या त्या मुलाने “कारण त्याने खूप सेंच्युरी मारल्या आहेत म्हणून.” असे उत्तर दिले. यावर “पण साईबाबांनी तर एकपण सेंच्युरी नाही मारली मग त्यांना आपण देव का म्हणतो?” असा प्रतिप्रश्न केल्यावर समोरचा गारच पडला.

९वीची परीक्षा दिल्यानंतर हर्षलने एका इलेट्रिशियनच्या हाताखाली उन्हाळाच्या सुट्टीमध्ये काम केल. १०वी सुरु झाल्यावर हर्षल पुन्हा यायला लागला. पण हर्षलच्या शैक्षणिक गरजा इतरांपेक्षा वेगळ्या होत्या. इतरांसोबत तो आला तर त्याला वेळ देणे शक्य होत नव्हते. तरी इंग्लिश आम्ही शिकत होतो. अश्यातच त्याने इतर विषयांसाठी दुसऱ्या ठिकाणी शिकवणी लावली. याच काळात त्याने घर देखील बदलले. इतर शिकवणीच्या वेळा आनंदघराच्या वेळेतच आल्याने, त्याचे आनंदघरात येणे बंद झाले. मात्र अधूनमधून हर्षल भेटत राहतो. हर्षलला टिकवून न ठेवता आल्याची खरतर एक सल मात्र कायम मनात घर करून आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. कदाचित १०वीची परीक्षा दिल्यावर हा पोरगा परत येईल. 

The story how we stopped 8 children from migrating for sugar-cane cutting with their parents....

  Hope is a good thing, may be best of things and no good thing ever dies... Our Fellows were very much disturbed when they got to know that...