Monday, June 30, 2025

Hope is a good thing—perhaps the best of things—and no good thing ever dies

Hope is a good thing—perhaps the best of things—and no good thing ever dies.

Imagine growing up in a community where you're not allowed to ask questions.

Where your future is predetermined even before you are born.

Where choices aren’t made—they’re forced.

Where you watch generation after generation endure the same fate.

But then someone dares to break the cycle.

It’s not easy. You receive life threats. You’re beaten. Your house is set on fire.

And still, you return.

You perform on the same streets where you were attacked just a week ago.

You rebuild in the same settlement where your home was burned.

You hold onto that one thing no one can take away from you—HOPE.

Hope that things can get better. And will get better—for good.


This is not a Bollywood script.

This isn’t the story of just one person.

This is the story of passionate grassroots leaders working tirelessly in the remotest corners of India.

Names we haven't heard.

Stories yet to see the light.

Voices that still go unheard.


Through Community Collectives, I’ve had the privilege of meeting some of these remarkable individuals.

It begins with reading their words in an application.

Then you hear their voice in a phone interview.

Eventually, the voice finds a face.

Strangers become friends.

Friends become a community.


Today, I am incredibly proud to introduce Cohort 6 of Community Collectives.

This year, we are working with 10 grassroots leaders from 6 Indian states.

Together, they are running 21 safe spaces, impacting over 1,500 children.

But that’s not all:

50% are first-generation school-goers.

1 in 3 have been child labourers themselves.

70% belong to the very communities they now serve.

Over the next year, we will walk alongside these grassroots leaders—offering them skills, knowledge, resources, and visibility to strengthen their work and deepen their impact.


Together, we will strive to create safe and joyful spaces of learning and support for children from historically marginalised communities like the Nat, Banjara, Phase-Pardhi, Musahar, Meer, and Fakir.

We will work to protect the right to a safe childhood for:

children living in the tribal belts of Bihar,

children selling balloons on the beaches of Goa,

children growing up in conflict zones of Chhattisgarh,

and children living in urban settlements across Maharashtra, Gujarat, and Uttar Pradesh.


Together we will address the disparity in society and in the not-for-profit world. Together, we will continue to hold onto that hope as a community.

Because hope is a good thing. And no good thing ever dies. 




Thursday, June 12, 2025

From Survival to Choice - Reimagining Childhood in India

Have you ever felt that you have absolutely no control over your own life?

That your choices aren’t really yours—but are instead shaped, forced, or dictated by circumstances you didn’t choose?

For millions of children in India, this isn’t just a passing feeling. It is their everyday reality.

India is home to approximately 364 million children aged 0–18 years, representing about 30% of the country’s population of over 1.4 billion. The distribution by age group is roughly:

0–6 years: ~158 million
6–14 years (elementary school age): ~195 million
15–18 years (secondary/higher secondary age): ~80 million

According to a 2023 report by the World Bank and UNICEF, 11.5% of children in India live in extremely poor households, which translates to around 52 million children surviving on less than $2.15 (₹178) per day. Children living in poverty are highly vulnerable to becoming trapped in the vicious cycle of child labor — where poverty forces them out of school and into work, and the lack of education, in turn, ensures they remain in poverty for life.

Challenges Faced by Children Living in Poverty

Limited access to education is just the tip of the iceberg. Children in poverty also face:

  • School-related challenges: Lower preparedness, poor attendance, stigmatization, and exposure to violence (domestic, workplace, verbal abuse).
  • Health issues: Anemia, malnutrition, stunted growth, and substance abuse.
  • Social challenges: Early marriages, teenage pregnancies, domestic abuse, and family separation.

According to the International Labour Organization (ILO), as of 2016, 152 million children aged 5–17 years were involved in child labour worldwide. Alarmingly, 114 million of these were children between 5–14 years, making up 75% of the global child labour population.

In the Indian context, the Census of India 2011 reported that 10.1 million children aged 5–14 were engaged in some form of work. However, more recent estimates from the ILO (2020) suggest a declining but still significant figure — 5.8 million children aged 5–17 years are currently working in India. Despite the decrease, the numbers continue to reflect deep-rooted systemic issues.

Maharashtra: A Closer Look

Maharashtra, one of India's most industrialized and economically advanced states, is not immune to this issue. According to PENCIL (Platform for Effective Enforcement for No Child Labour). Maharahstra reported 25000 child labors. But according to the other reports and estimation it is a highly underreported figure.

The prevalence of child labour is particularly notable in:Agricultural sectors, especially sugarcane harvesting and cottonseed production

  • Brick kilns, stone quarries, and construction work
  • Small-scale industries, including zari work, fireworks, bidi rolling, and leather goods
  • Informal service sectors, such as domestic help, roadside stalls, and automobile repair
  • Addressing these challenges demands more than educational reforms. Today, on World Day Against Child Labour, we must confront an uncomfortable truth:

Child labour isn’t just a violation of rights—it’s a consequence of social and economical inequality.

To truly eliminate child labour, we must go beyond education alone.

We must:

Invest in community resilience
Build holistic support systems
Design child-focused public policies
Address gender and caste-based vulnerabilities

Let us not just raise awareness, but raise our voices.

Let us not just condemn child labour, but commit to action. 

Let’s build a world where every child has the freedom to dream—and the power to choose.

Saturday, June 7, 2025

Redefining Passion and Dedication

We opened applications for our Community Collectives program in February. A few days later, one of our team members received a call from a grassroots leader in Uttar Pradesh. With a polite tone, he asked if he could submit the application a bit later. The reason he gave shook us: he had just lost his wife, who was only in her late twenties, two days earlier.

A few days after that, during the virtual final panel selection, I was speaking with one of the finalists. When I asked him how his week had been, he shared that just three days after our panel, his elder brother had committed suicide. It had been only five days since that tragedy, yet he was still determined to participate in our process. I apologized and offered to postpone the conversation, but he said he wanted to continue—for his brother, who had always supported him.

Through Community Collectives, I have the privilege of meeting grassroots leaders working in some of the most remote corners of the country. Every time, I am humbled by their unwavering dedication, commitment, and perseverance.

Yes, we too face challenges—but they are rarely matters of life and death. Every time I talk to grassroots leaders who stand tall amidst unimaginable adversities, I wonder why they are so determined to participate in this process. They always say, “We don’t get these opportunities often, and now that we have one, we want to make the most of it.”

The not-for-profit sector often favors those in metropolitan areas who speak fluent English, leaving many passionate grassroots leaders overlooked. These leaders deserve a fair chance to step up, to lead, and to build resilient communities. Through Community Collectives, we are striving to bridge this gap—but we can’t do it alone.

We need your support. Are you with us?



Monday, November 6, 2023

The story how we stopped 8 children from migrating for sugar-cane cutting with their parents....

 Hope is a good thing, may be best of things and no good thing ever dies...

Our Fellows were very much disturbed when they got to know that almost 16 children from Chopda Anandghar are going to migrate with their parents. They brainstormed on various ideas of how we can stop this and what we should do if migration still happen.
From the next day they started having dialogue with parents to understand why they are migrating and if there is any possibility of them not going. They were constantly going to their houses to convince them to not go. Most of the people have taken advances from their Mukadam and have spent it to fulfill their daily needs and now they had no money to return. The parents understands that the migration is going to hamper the future of their children but had no answer of what they should do. They were helpless and so were we.
It took Shubham and Kalusing a week before they got the first success. The grand-mother of Ritik and Vir announced to other family members during dinner that they are not going to migrate and she is willing to face all circumstances of the decision. Her determination gave power to the other family members and in next 3 days they arranged Rs. 10000/-, the advance they had taken from the Mukadam. Ritik and Vir's father went to Mukadam, returned the advance and told him that they are not going to come.
But this is not the end. The decision of Ritik & Virs family worked as a motivation for others as well.
I am happy, thrilled, excited, overjoyed to share, to announce that this year we have successfully stopped migration of 8 children and their families. This is not a small victory.
8 children not going to the work with their parents mean 8 children saved from child-labour. This also means 8 children saved from facing abuse. This also means 8 children not dropping out of the school. This also means a ray of hope for better future for 8 families.
This also means that we were not able to stop 8 children going out with their parents. But we have not lost hopes. We had distributed worksheets, stationery and relevant study material to the children along with the numbers of Shubhal & Kalusing to stay in touch..

At Vardhishnu we believe that Every Child Matters. It is one child at a time for us. It is because of the determination, dedication and passion of our Fellows, team members which makes this possible. We face lots of adversities when we work, be it not having enough funds, not having a closed space for running Anandghar, CSRs, funding agencies not willing to break their comfort zones of staying in metros. But we have people who are highly qualified, yet they have decided to be with children in an hostile environment, we have passion, we have an unending zeal of making a change in this world. To create a better, safer, happier world for every child. Because EVERY CHILD MATTERS...EVERY CHILD COUNTS...

Copyright @ Adwait Dandwate

Monday, September 26, 2022

When your children starts their own 'Anandghar'....

Pratiksha, currently studies in 7th grade. She is the 1st batch of students of Anandghar to whom we enrolled in school in 2016. Pratiksha used to work as a waste picker along with her mother and younger brother getting enrolled in schools. She is still a regular student of Anandghar.
Anandghar runs from Monday to Friday; so she along with her friends decided to run their own Anandghar for the children from the community on every Saturday.
They started the campaign from Thursday last week. Asked each and every student of Anandghar whether they would like to join 'their' Anandghar on Saturday. Noted down names of the interested children and then on Saturday they inaugurated their Anandghar with 25+ children in the narrow lanes outside her home.
You can see Pratiksha Didi, Shalu Didi, Roshani Didi and Bhuri Didi teaching kids in this picture shared with me by Pratiksha after hugely successful 1st day.

PS. They also distributed Bananas as nutritional food just like Anandghar

Wednesday, July 13, 2022

Aditi tai was reading a story to Dadu and he just slept in her arms.

Dadu's day starts at 5 in the morning when he goes to the dumping ground. He usually comes back at 02:00 / 03:00 pm. After eating something he couldn't wait any longer to come to Anandghar. For a 8 year boy like him, it is an very exhausting job. Most of the times he is very exhausted by the time he comes to Anandghar. But he never skips the center.

Even if he decides to stay home, he does not have the luxury to take an afternoon nap.
On that day, Dadu came late to the center, he picked up a book and ask Aditi Tai to read him a story. She was reading a story to him when he just slept on her shoulders and Aditi just sat in that position for next about 20 minutes as she did not wanted to disturb him.
He is not the only one who sleeps at Anandghar. There are few other children also and they do it because they feel safe.
Incidences like this let us know that whatever we are doing is really worth doing....

Thursday, March 22, 2018

The Nigerian Witch Boy



नायजेरिया, आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला छोटासा देश. लोकसंख्या सुमारे १९ कोटी. लोकसंख्येच्या मानाने आफ्रिकेतील सगळ्यात मोठा देश. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीयांची संख्या सगळ्यात जास्त असली तरी २५० हून जास्त समूह असलेला हा देश. जगातील सगळ्यात श्रीमंत कृष्णवर्णीय व्यक्ती नायजेरीन आहे मात्र दुसरीकडे नायजेरियातील ६१%हून अधिक लोकं दारिद्र्यरेषेखाली राहतात. यांचे दैनिक उत्पन्न 1 $ हून म्हणजे ६५ रुपयांहून कमी आहे.
नायजेरियात सार्वजनिक आरोग्य सुविधांचा अत्यंत अभाव आहे. येथील लोकांचे सरासरी आयुष्य ५२ वर्षे आहे, भारताशी तुलना केल्यास भारतातील लोकांचे सरासरी आयुष्य ६९वर्षे तर अमेरिकेसारख्या देशांत हेच ७९वर्षे आहे.  नायजेरियातील साक्षरता दर हा ६०% टक्के आहे. शिक्षण, अंधश्रद्धा या अत्यंत गंभीर समस्या झाल्या आहे.
मुळची डेन्मार्कची अॅन्जा लोवन (Anja Ringgren Lovén) तिच्या नवऱ्यासोबत नायजेरियाला आली आणि लहान मुलांना वाचवण्यासाठी म्हणून त्यांच्या आफ्रिकन चिल्ड्रन एड एज्युकेशन & डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेमार्फत काम करायला सुरुवात केली. ज्यांना वाचवण्यासाठी म्हणून काम करत होती ती मुलं कोण होती? तर घरच्यांनी वाईट शक्तींनी पछाडलेला (Witch), चेटूक करणारा, असे ठरवून सोडून दिलेले, वाळीत टाकलेले हे छोटे जीव. हि चिमुरडी मुलं चेटूक करतात हा त्यांच्यावरचा आरोप. कुटुंबियांच्या वाईट आर्थिक परिस्थितीला, संकटांना मुलांनी केलेलं चेटूक कारणीभूत आहे या मानसिकतेतून नायजेरियात असंख्य मुलांना पालक सोडून देतात. जी घरात टिकतात त्यांना याच कारणाने कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडावे लागते.
एकदा का एखाद्या मुलाला / मुलीला पछाडलेल ठरवले गेले कि बाधा दूर करण्यासाठी गावातील पुजाऱ्याला किंवा एखाद्या मांत्रिकाला बोलावले जाते. एका अभ्यासानुसार नायजेरियात १९९९ पासून आजपर्यंत सुमारे १५००० मुलांना पछाडलेला (witch boy / girl) म्हणून वाळीत टाकण्यात आले आहे तर १००० हून जास्त मुलांना मारले गेले आहे.
फोटोतल्या ह्या चिमुरड्यामुलावर देखील असाच आरोप करून घरच्यांनी त्याला सोडून दिले होते. नायजेरीच्या रस्त्यांवर पडलेला कचरा खाऊन हा न जाणो किती दिवस जगत होता. अॅन्जा लोवनला तो दिसला त्यावेळी पूर्णपणे नग्नावस्थेत होता, त्याच्या हाडाचा सापळा तेवढा उरला होता. संपूर्ण शरीरावर जखमा होत्या आणि अळ्यांनी ते शरीर पोखरून काढलेलं होत. त्याला नीट उभ राहता येत नव्हत कि नीट चालता येत नव्हत.
३० जानेवारी २०१६ला अॅन्जाने या मुलाला वाचवलं. या दिवसाबद्दल अॅन्जा म्हणते, “आम्हाला फोन वर एकाने अगदी २/३ वर्षाच्या मुलाबद्दल माहिती दिली होती. एवढ लहान मुलं फार काळ रस्त्यावर एकट जगू शकत नाही म्हणून आम्ही लगेच तयारी सुरु केली. आम्ही ज्यावेळी मुलाच्या शोधात या गावात पोहोचलो तेव्हा माझ लक्ष रस्त्याच्या कडेला बसलेल्या या अगदी काही वर्षाच्या चिमुरड्याकडे गेल. मी देखील नुकतीच काही महिन्यांपूर्वी आई झाले होते पण ह्या चिमुरड्याची परिस्थिती पाहून मी हादरून गेले. ”
अॅन्जाने त्याला प्यायला पाणी दिलं, बिस्किटं दिली. ह्याच वेळी कोणीतरी हा फोटो काढला. अॅन्जाने स्वतःच्या फेसबुक प्रोफाईलवर हा फोटो शेअर केला आणि काही कालावधीतच हजारो लोकांनी त्यावर कमेंट लिहायला, तो फोटो शेअर करायला सुरुवात केली. पण अॅन्जा लोवन एवढच करून थांबली नाही. तिने  त्याला संस्थेत आणले आणि त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्याचे नाव ठेवले ‘होप’ (Hope). होपला दवाखान्यात दाखल केले गेले. डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरु केले आणि लवकरच त्याचे परिणाम दिसून येऊ लागले.
होपला मदत करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जगभरातून 10 लाख डॉलरपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. यामुळे त्याचे ऑपरेशन होऊ शकले. आज होप अॅन्जाच्या संस्थेतल्या आणखी सुमारे ६० मुलांसोबत राहतो आहे.
२०१६ साली अॅन्जा लोवनला जर्मनीतील ‘Ooom’ मॅगिझनने वर्षातील प्रेरणादायी व्यक्तीचा सन्मान दिला. हा सन्मान मिळवताना तिचे प्रतिस्पर्धी होते, दलाई लामा, पोप फ्रान्सिस आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा.
नुकतच बरोबर एका वर्षाने अॅन्जाने पुन्हा एकदा ह्या चिमुरड्यासोबतचा फोटो शेअर केला. होपला आता शाळेत जायला लागला आहे.
चेटूक करतात म्हणून लहानपणीच कुटुंबीयांनी सोडून दिलेल्या या मुलांच्या मनावर या घटनेचे सहजासहजी न मिटणारे असे तीव्र पडसाद उमटलेले असतात. ह्यातून बाहेर काढून त्यांना प्रेम देणाऱ्या होप आणि तिच्या संस्थेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
रस्त्यावर एकट्या पडलेल्या मुलांना  पाहून बहुतांश जरी नाकाला रुमाल लाऊन पुढे निघून जातात तरी काही मात्र त्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देतात....नुसते सगळेच निरोज गेस्ट नसतात......

अॅन्जा लोवन आणि तिच्या संस्थेविषयी आणखी जाणून घेण्यासाठी: https://dinnoedhjaelp.dk/en/

Sunday, March 18, 2018

The Vulture & the Girl



केविन कार्टरया जगप्रसिद्ध छायाचित्रकाराने काढलेले हे चित्र.
केविनचा जन्म साउथ आफ्रिका मधील जोहान्सबर्ग येथे १९६० साली झाला. फोटोग्राफीला सुरुवात केल्यानंतर केविनने लवकरच ‘the bang bang club’ला जॉईन केले. मुख्यतः साउथ आफ्रिकेतल्या शहरांमध्ये कृष्णवर्णीय लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचे, अन्यायाचे फोटो काढणाऱ्यांना ‘bang bang club’ या नावाने ओळखले जाई. हिंसाचार, खून, दंगलीचे फोटो काढणे हा केविनच्या कामाचा भागच होता. अनेकदा यासगळ्या त्रासापासून स्वतःला तोडून ठेवण्यासाठी तो ड्रग्जचा सहारा घेत असे. याच ‘the bang bang club’ या अंतर्गत १९९३साली सुदान येथे पडलेल्या भयंकर अश्या दुष्काळाची बातमी कव्हर करण्यासठी गेला.
तिथे आयोड या एका छोट्याश्या गावात असलेल्या एका खाद्य पुरवठा केंद्राच्या काही अंतरावर त्याने हे चित्र काढले. या चित्रात दिसत असलेले छोटसे बाळ खरतर मुलगा आहे मात्र सुरुवातील हे छायाचित्र प्रकाशीत झाले तेव्हा मात्र ती मुलगी असल्याचे अनेकांचे मत झाले आणि त्याच नावाने ते चित्र प्रसिद्ध देखील झाले.
26 मार्च १९९३च्या द न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापून आले. त्यावेळी त्याखाली लिहिले होते, ‘A little girl, weakened from hunger, collapsed recently along the trail to a feeding center in Ayod. Nearby, a vulture waited’ (भुकेने व्याकुळलेली एक मुलगी, आयोड येथे असलेल्या ‘खाद्य केंद्रावर जाताना कोसळून पडते. शेजारी एक ‘गिधाड’ प्रतीक्षेत)
काही काळातच हे छायाचित्र जगातील अनेक मासिकांत, वृत्तपत्रात छापले गेले. ह्या छायाचित्रने जगभरातील लोकांना सुदान इथल्या भयानक अश्या दुष्काळाची जाणीव करून दिले. अनेकांनी सुदानला मदत पाठवायला सुरु केली. मात्र हि बातमी छापून आल्यावर टाईम्सला अनेकांनी पत्र पाठवून त्या मुलीच काय झालं? ती वाचली कि नाही? अशी विचारणा करायला सुरुवात केली.
मात्र हे छायाचित्र काढणाऱ्या केविनला याची काहीच कल्पना नव्हती. त्याच काम झाल्यवर तो तिथून निघून आला होता. शेवटी ३०मार्चला टाईम्सने संपादकीयमध्ये याला उत्तर दिले, “अनेक लोकांनी आमच्याकडे पत्राव्दारे मागील आठवड्यात प्रकाशित झालेल्या छायाचित्रातील मुलीचे पुढे काय झाले अशी विचारणा केली. मात्र छायाचित्र काढल्यावर छायाचित्रकाराने गिधाडाला पळवून लावले व लगेच पुढे वाटचाल सुरु केली. त्यामुळे ती मुलगी केंद्रापर्यंत पोहोचली कि नाही याबद्दल त्यास माहित नाही.”
केविन कार्टरने या संपूर्ण प्रकरणाबद्दल सांगितले आहे की दिवसभर आयोडच्या केंद्रावर येणाऱ्या लोकांचे फोटो काढल्यानंतर तो गावाच्या बाजूला असलेल्या ओसाड प्रदेशावर काही फोटो काढता येतात का म्हणून एकटाच बाहेर पडला. जवळच एका लहान मुलीच्या जोरजोरात धापा टाकण्याच्या आवाजाने त्याचे त्याकडे लक्ष गेले. केंद्रावर पोहोचण्याच्या प्रयत्नासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करणारी एक छोटी चिमुरडी केंद्राच्या रस्त्यावरच कोसळली होती आणि त्याबाजूला तिच्या मृत्यूची वाट पाहत एक गिधाड. त्याने सुमारे २० मिनिटे ते गिधाड तिथून उडून जाईल याची प्रतीक्षा केली. मात्र तसे झाले नाही तेव्हा त्याने ह्याचे छायाचित्र घेतले आणि गिधाडाला पळवून लावले,  त्या चिमुरडीने तोपर्यंत अंगात जोर आणूस कशीबशी केंद्राकडे चालायला सुरुवात केली होती. मात्र केविन लगेचच तिथून निघून गेला. केविन म्हणतो,” मी सिगारेट पेटवली, आणि एका झाडाखाली बसून एकटाच तीन तास रडत होतो.”
सुदान येथील रोगांची लागवण पत्रकारांना होऊ नये यासाठी त्यांना कोणत्याही व्यक्तीला हात लावण्याची परवानगी नव्हती. मात्र अनेकांनी केविनवर त्या मुलीला मदत न केल्याबद्दल टीका केली. पीटर्सबर्ग टाईम्सने या बद्दल लिहिताना म्हणले, “ एका चिमुरडीच्या त्रासाला फोटोत कैद करण्यासाठी स्वतःच्या कॅमेराची लेन्स adjust करणारा माणूस म्हणजे त्या ठिकाणी हजर असलेलं दुसर  गिधाडच”
ह्या फोटोला मानाचा असा पुलित्झर पुरस्कार मिळाला मात्र केविन त्या मुलीचे नेमके झाले काय ह्या प्रश्नाने आता केविनला सुद्धा छळायला सुरु केली होती. शेवटी हा फोटो काढल्यानंतर सुमारे ६ महिन्यांनी केविन कार्टरने आत्महत्या केली आणि स्वतःला या त्रासातून मुक्त केले.
केविनची suicide note म्हणते...”मला निराशेने ग्रासले आहे...माझ्याकडे फोन घ्यायला, घराचे भाडे भरायला, मुलांचा सांभाळ करायला, कर्ज फेडायला पैसा नाही....मृत्यू, मृतदेह, संताप, दुखः ह्या सगळ्याच्या आठवणी मला छळायलाच लागल्या आहेत....आठवणी....जखमी, भुकेल्या चिमुरड्या मुलांच्या, पोलिसांच्या, लोकांना मारणाऱ्याच्या... मी केनला (नुकतीच मृत्यूमुखी पडलेली केविनची सहकारी) भेटायला जातो आहे..मी जर नशीबवान असेन तर कदाचित तिला भेटेनही.....”

Thursday, March 15, 2018

निरोज गेस्ट.....



परवा मी ‘निरोज् गेस्ट’ वर लिहिलेली पोस्ट अनेकांनी वाचली, शेअर केली, त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या. मला मोर्च्याच्या, आंदोलनाच्या, सरकारच्या आणि विरोधी पक्षांच्या राजकारणात जायचं नाहीये. खरतर ती पोस्ट लिहिण्या मागची अनेक कारण आहेत. सरकारची आणि समाजाची शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती असेलेली असंवेदनशीलता, समाजच स्वतःच्या आनंदात, सुखात मश्गुल असण ही जशी काही कारणं झाली तसेच दुसरे कारण म्हणजे अलका धुपकर आणि इतर पत्रकारांनी मोर्च्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या रक्ताळलेल्या पायांचे फोटो. 
वूडलॅन्ड, रिबॉक, नायकीची चार-सहा हजाराची बुट आणि सॅन्डल घालणारी आपण, घराच्या कोपऱ्यावर दुध घ्यायचं झालं तरी टू-व्हीलर आणि कार नेणारी आपण, आज किती चाललो हे मोजण्यासाठी हातात ‘smart watch’ घालणाऱ्या आणि त्यावर किती ‘calories’ burn केल्या हे बघणारी आपण, दिवसभर एसीत बसून संध्याकाळी जिम मध्ये (तीही एसी) ट्रेडमिल वर चालून, “आज मी ३ किमी चाललो बाबा!” अस कौतुकाने आणि ‘अभिमानाने’ मित्रांना सांगणाऱ्या आपल्याला भर उन्हात साधी स्लीपर घालून शेकडो मैल चालणाऱ्या शेतकऱ्यांच दुखः, त्रास, वेदना समजतील तरी कश्या?
शब्दांपेक्षा चित्रजास्त परिणामकारक असतात असे म्हणतात. मात्र काही अशी चित्र असतात जी कितीही ठरवलं तरी तुमच्या नजरेसमोरून पटकन जात नाहीत. तुमचे विचार अनेक काळ त्या चित्रांभोवती फिरत राहतात. अगदी तसचं मोर्च्यात सहभागी शेतकऱ्यांची रक्ताळलेली पाउल बघून माझ देखील झालं. त्या पाउलांनी मला अस्वस्थ केलं आणि लिहित केलं.
अनेकांना त्यात राजकारण दिसतय पण मला मात्र फक्त ती रक्ताळलेली पाउलच तेवढी दिसतायेत. अश्या अनेक छायाचित्रांनी मला कायमचं अस्वस्थ केलंय. इतिहासात अशी अनेक महत्वाची चित्र आहेत तसाच प्रत्तेक चित्राचाही काहीतरी इतिहास असतोच. दुर्दैवाने यातली अनेक चित्र ‘निरोज गेस्ट’ या संकल्पनेभोवतीच फिरतात. अशीच काही छायाचित्र आणि त्या मागचा इतिहास तुमच्या समोर पुढील काही दिवसात टप्प्या-टप्प्याने घेऊन यावं आणि आपल्यातल्या संपून चाललेल्या संवेदनशीलतेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा एवढीच इच्छा!


Saturday, May 20, 2017

आनंदघर डायरीज

हर्षल

सुरुवातीच्या मरिमाता मंदिराच्या परिसरात रिकामटेकडी लोक पत्ते खेळत बसलेली असायची. नाहीतरी पैसे लाऊन इतर खेळ सुरु असायचे, याच अंगणात आनंदघर सुरु झाले आणी चित्र पालटायला सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही तिथे बसलो तरी आम्हाला न जुमानणारी हि लोकं आता आम्ही आलोय हे दिसताच स्वतःचे सामान आवरून बाहेर पडायला लागली. पत्त्याच्या जागी आता लहान चिमुरड्याची लगबग तिथे सुरु झाली. मरिमातेचे आंगण लहान मुलांनी गजबजून जायला लागले. अश्याच एका दिवशी एक मुलगा आमच्या जवळ आला आणि “सर, उद्या पासून मी पण येऊ का?” अस आम्हाला विचारल अर्थातच आम्ही लगेच त्याला हो सांगितल. तो परत जायला निघाला तेव्हा “अरे तुझ नाव तर सांग.” अस मी त्याला विचारलं आणि तो म्हणाला, “हर्षल”.
हर्शल तेव्हा ८वीत होता. अंगकाठी अगदी बारीक. घरी तो, त्याचे आई-वडील आणि भाऊ. तिथेच जवळ त्याच्या वडिलांची भाजी-पाल्याची गाडी होती. हर्षल इतर मुलांपेक्षा खूपच वेगळा. अत्यंत हुशार. बुद्धिमत्ता तीव्र. सतत नवीन काहीतरी करण्याच्या शोधात. त्याच्या वयाच्या इतर मुलांसारखी त्याला कुठलीच व्यसन नव्हती. अत्यंत शांत. कधी कुणाशी भांडण नाही, कुणाला शिव्या देणार नाही, कुणाची खोड काढण नाही.
त्याकाळात जळगावात लोडशेडिंग सुरु होत. इतर ठिकाणी २ तास लाईट जात असेल तर तांबापुरात सकाळी २/३ तास आणि संध्याकाळी २/३ तास अशी किमान ४/६ तास वीज नसायची. सकाळच्या वेळी काही अडचण यायची नाही. पण संध्याकाळी वीज नसली कि हर्षलला अभ्यास करायला त्रास होत होता. या पठ्याने एक दिवस भंगारबाजारात जाऊन २० रुपयाचे LED लाईट, मोबाईलची बॅटरी आणली, इकडून-तिकडून काही तारा गोळ्या गेल्या आणि चक्क दिवसाचार्ज केले कि रात्री वीज गेल्यावर देखील व्यवस्थित उजेड देणारे बल्ब तयार केले. आनंदघरात येताना आम्हाला दाखवायला घेऊन आला.
त्यानंतर काही दिवसांनी गाणी ऐकायला काही नाही अस वाटल्याने परत भंगारबाजारात जाऊन थोड्या वस्तू विकत आणल्या आणि त्याचा मोबाईलच्या बॅटरीवर चालेल असा चक्क FM रेडीओ तयार केला आणि तोही फक्त ३० रुपयात. आम्हाला या पोराच प्रचंड कौतुक वाटल.
एके दिवशी हर्षल आनंदघरात आला नाही, दुसऱ्यादिवशी त्याला कुठे गेला होतास अस विचारल्यावर. “आमच्या समाजाचा कार्यक्रम होता. मग आपल्या समाजाच्या कार्यक्रमात जायला नको का?” अस त्यानेच मला प्रतिप्रश्न केला. याचाच आधार घेऊन मी आणि हर्षल बोलायला लागलो. बराच वेळ बोलल्यानंतर, अगदी शेवटी तो मला म्हणाला,”मग जर कुणी आपली जात विचारली तर काय उत्तर द्यायचं?” मी म्हणालो,”माणूस म्हणून सांग”. आणि तो विषय तिथेच संपला.
तांबापुरा परिसरात हिंदू-मुस्लीम लोकसंख्या जवळपास समान आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी इथे देखील दर काही महिन्यांनी वादाची ठिणगी पडली जाते आणि जातीय दंगली घडवून आणल्या जातात. काही दिवसानंतर अशीच एक दंगल घडली, ज्यामुळे पुढचे काही दिवस आम्हाला आनंदघर बंद ठेवावे लागले. ज्यावर नंतर चर्चा करताना मुलांनी हे कस चुकीच आहे अशी याबद्दल स्वतःहून चर्चा केली. या चर्चेत अचानक हर्षलने मला प्रश्न केला,”सर तुमची जात कुठली?” मी लगेच उत्तर दिले,”माणूस”. “ठीक आहे.” अस म्हणून हर्षलच उत्तर आला. “का रे अस काय झाल तुला विचारायला?” तर त्यावर त्याने उत्तर दिल,”नाही काही दिवसापूर्वी तुम्ही मला सांगितल होत कि जात विचारली तर माणूस म्हणून सांगाव आणि तसच वागाव. मग मी बघत होतो, आता तुम्ही काय उत्तर देता ते.” तुमच्या प्रत्तेक कृतीवर, बोलण्यावर मुलाचं अगदी बारीक लक्ष असत. अनेक बाबतीत ते तुमच अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. अश्या वेळी जर तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक वाटला तर मुल लगेच तुम्हाला तो दाखवून द्यायला कमी करत नाहीत किंवा त्यांचा तुमच्या बोलण्यावरून विश्वास उडायला लागतो, पण हेच जर तुम्ही जे बोलता तसेच वागता अस मुलांचा जाणवत तेव्हा त्यांचा तुमच्याबद्दलचा आदर, प्रेम वाढत या सर्वोत्तम प्रात्यक्षिकच त्या दिवशी मला मिळाल.
कुमार निर्माणच्या शिबिरात वर्षभरात केलेल्या कृतींची माहिती देण्याच काम देखील याचच. . या शिबिरांमध्ये मुलच कामाची माहिती देतात आणि इतर गटातली मुल त्यांना प्रश्न विचारतात. अश्याच एका शिबिरात एकाने ‘सचिन – क्रिकेटचा देव’ या विषयावर माहिती दिली. यावर हर्षलनेस सचिनला क्रिकेटचा देव का म्हणतात? असा प्रश्न केला. थोड्याच्या गोंधळात पडलेल्या त्या मुलाने “कारण त्याने खूप सेंच्युरी मारल्या आहेत म्हणून.” असे उत्तर दिले. यावर “पण साईबाबांनी तर एकपण सेंच्युरी नाही मारली मग त्यांना आपण देव का म्हणतो?” असा प्रतिप्रश्न केल्यावर समोरचा गारच पडला.

९वीची परीक्षा दिल्यानंतर हर्षलने एका इलेट्रिशियनच्या हाताखाली उन्हाळाच्या सुट्टीमध्ये काम केल. १०वी सुरु झाल्यावर हर्षल पुन्हा यायला लागला. पण हर्षलच्या शैक्षणिक गरजा इतरांपेक्षा वेगळ्या होत्या. इतरांसोबत तो आला तर त्याला वेळ देणे शक्य होत नव्हते. तरी इंग्लिश आम्ही शिकत होतो. अश्यातच त्याने इतर विषयांसाठी दुसऱ्या ठिकाणी शिकवणी लावली. याच काळात त्याने घर देखील बदलले. इतर शिकवणीच्या वेळा आनंदघराच्या वेळेतच आल्याने, त्याचे आनंदघरात येणे बंद झाले. मात्र अधूनमधून हर्षल भेटत राहतो. हर्षलला टिकवून न ठेवता आल्याची खरतर एक सल मात्र कायम मनात घर करून आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. कदाचित १०वीची परीक्षा दिल्यावर हा पोरगा परत येईल. 

Saturday, April 15, 2017

आनंदघर डायरीज
गुड्डी आणि पूजा

आनंदघर सुरु करून काही दिवसच झाले होते. त्यावेळी पहिल्यांदा गुड्डी आणि पूजा या दोघा बहिणींशी ओळख झाली. पूजा १४/१५ वर्षाची तर धाकटी गुड्डी साधारण ८ वर्षाची. वडील नाहीत. घरी या दोघी आणि यांची आई.
पूजा आणि तिची आई दिवसभर कचरा वेचायला जायच्या आणि गुड्डी घरी बसून घरकाम करायची. दिवसा ती देखील कचरा वेचायला जायची पण दुपारपर्यंत परत येणार. संध्याकाळी आई आणि पूजा परत येईपर्यंत भाजी, भाकरी तयार करण, भात लावण, घर झाडून पुसून काढण हि सगळी काम गुड्डीची. वयाच्या मानाने उंची थोडी कमीच, थोडीशी लट्ठ, गुटख्याने कायम तोंड भरलेल आणि त्यासोबत शिव्यांची लाखोली. गुड्डीच कुठलंच वाक्य शिवी दिल्याखेरीस पूर्ण होतच नाही. अत्यंत भांडखोर म्हणून सगळ्यांमध्ये प्रसिद्ध. पण हळू-हळू लक्षात यायला लागल कि हि मुलगी हुशार आहे. धीट आहे. गुड्डीच इतरांशी कधीच पटल नाही. एखाद्याने त्रास दिला तर हि कानाखाली वाजवून द्यायला पण कमी करायची नाही. थोड जरी मनाविरुद्ध झाल कि हिने समोरच्याला तुडवलाच म्हणून समजा. सुरुवातीला आम्हाला देखील हिच्याशी वागाव कस हे कळायचं नाही.
गुड्डीच वागण, बोलण, शिव्या देण, मारण हे काही इतरांपेक्षा वेगळ नव्हत. बहुतांश कचरा वेचक मुला/मुलींमध्ये हे दिसून येत. वरवर पाहता, “मुलांना शिस्त नाही.” “पालकांनाच कस वागाव हे कळत नाही तर मुलांना कुठून कळणार?" “हि मुल अशीच असतात.” अस म्हणन खूप सोप आहे. पण मुलांच्या मनाचा विचार केला कि ह्या सगळ्याच मूळ समजून घेता येण शक्य आहे. 
गुड्डीच्या बाबतीत म्हणायचं झाल. तर खेळण्याच्या, मजा करण्याच्या वयात आपल्याला  घरकामात अडकून पडाव लागतंय ह्याचा प्रचंड राग तिच्या मनात होता. इतरांना खेळायला मिळत, पण मला नाही ह्याची चीड तिला होती आणि घरच्यांचा सगळा राग ती इतरांवर काढत होती. पण पोरगी प्रचंड लाघवी. जीव लावणारी.
हिच्या भांडकुदळ स्वभावामुळे कुणी सुरुवातील तिच्यासोबत बसायला तयार नसायचं. पण हळू हळू चित्र बदलायला लागल. गुड्डीला नकला करायला प्रचंड आवडायचं. कुमार निर्माणच्या एका शिबिराला तर हिने भूताचा इतका मस्त अभिनय केला कि सगळेच तिचे फॅन झाले. पुढचे कित्तेक दिवस सगळेच गुड्डीच कौतुक करत होते. या कौतुकाने ती अगदी हुरळून गेली होती. अभ्यासात लक्ष द्यायला लागली होती. गुटखा सोडण्याचा प्रयत्न करत होती. किमान सेंटरवर असताना तरी आता तिच्या तोंडात गुटखा नसायचा.
दुसरीकडे पूजाला नट्टा-पट्टा करायला आवडायचं. भडक कपडे, स्वच्छ विंचरलेले केस आणि सतत गुटखा खाऊन लाल-लाल झालेलं तोंड असा एकून पूजाचा अवतार असायचा. पूजा अगदी गुद्दीच्या उलट. कोणाशी फारस बोलणार नाही. आली तरी शांत बसणार, पुस्तक हातात घेऊन वाचायचा प्रयत्न करणार. काही महिन्यांच्या प्रयत्नांनंतर पूजा अगदी व्यवस्थित वाचायला लागली होती.
पूजा वयात येत होती. तिच्यात होणारे शारारिक आणि मानसिक बदलांमुळे थोडीशी घाबरलेली होती. विरुद्ध लिंगाबद्दलच आकर्षण वाढत होत. हा बदल आमच्याही लक्षात येत होता. मुलाचं लक्ष आपल्याकडे जाव, ह्यासाठी तिचा चाललेला आटापिटा आमच्या नजरेत येत होता. प्रणाली तिच्याशी या विषयावर अधूनमधून बोलत होती. पण एक दिवस अचानक तिच्या हातात कुठूनतरी मोबाईल आला आणि पूजाच सेंटरवर येण अचानक बंद झाल. पूजाने कामाला जाण बंद केल होत. दिवसभर हातात मोबाईल घेऊन त्यात काहीतरी करत बसलेली असते अस सगळ्यांनी अम्हाल सांगितल.
तिच्याशी बोलायला म्हणून मी आणि प्रणाली तिच्या घरी गेलो. एरवी आपले शिक्षक दिसले हि उलट्या दिशेने पळत सुटणारी पोर आपण बघतो पण आमच्या इथे सगळ उलटच असत. आम्हाला बघितल कि मुल असतील तिथून, असतील तशी पळत सुटतात आणि आम्हाला येऊन बिलगतात. आजपर्यंत आम्हाला बघून पळून जाणारी आणि घरात लपणारी पूजा हि एकमेव मुलगी. त्या दिवशी आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा आम्हाला दुरूनच बघून ती घरात पळून गेली. तिच्या आईने मात्र आम्हाला ती बाहेर गेलीये अस सांगतील.
सुरुवातीला घरकामात किमान थोडीतरी मदत करणाऱ्या पूजाने आता सगळच अंग काढून घेतल्याने गुड्डीची चिडचिड वाढत होती. यामुळे ति सतत गैरहजर राहायला लागली होती. पूजाबद्दल मुलांकडून वेगवेगळ्या गोष्टी कानावर पडू लागल्या. काही दिवसानंतर गुड्डीच देखील सेंटरवर येण बंद झाल. विविध प्रकारे त्यांच्याशी संपर्क करण्याचे सगळे प्रयत्न सपशेल फेल गेले आणि अश्यातच एक दिवस पूजा आणि गुड्डीने आईसहीत एका रात्रीतून जळगाव सोडल. कुठे गेले? का गेले? काही कळल नाही....
शाळेत जायला प्रचंड उत्सुक असलेली गुड्डी, शाळेत गेली का? कुठे राहते? काय करते या कुठल्याच प्रश्नांची उत्तर मिळाली नाहीत.


P.S. काही दिवसापूर्वी अचानक गुड्डी सेंटरवर दाखल झाली. पूर्वीपेक्षा लक्षात येईल इतक वजन कमी झालंय. अंगात सणाचे चांगले कपडे होते. इथून अचानक का गेले? याच उत्तर तिने दिल नाही मात्र कुठे असते? याची चौकशी केल्यावर सध्या ते सगळे नाशिकला असतात अस कळल. नाशिकच्या एका वस्तीत त्यांनीदेखील एक झोपडी बांधलीये आणि आता तिथच ती आणि तिची आई दोघी राहतात. शाळेत नाव टाकलंय अस म्हणाली, पण फारस ठामपणे नाही. गुड्डी आता नाशिकमध्ये कचरा वेचते.

Saturday, April 8, 2017

आनंदघर डायरीज...

नेहा
आनंदघराच्या सुरुवातीच्या काळात फक्त तिथ जायचं आणि मुलांसोबत मस्तपैकी गप्पा मारायच्या एवढंच आमचा दिनक्रम होता. लॅपटॉपवर कार्टून बघायची, काही गाणी बघायची, गाणी म्हणायची. ज्यांना यात मजा येत होती ती हे सगळ करताना रमून जायची आणि ज्यांना काही मजा नाही अस वाटायचं ती मात्र त्यांच्या-त्यांच्यात दुसरा काहीतरी खेळ शोधून काढायची किंवा इतरांना त्रास द्यायची. नेहा ह्या दुसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या मुलींपैकी एक.
वय साधारण १०वर्ष, अंगकाठी अगदी बारीक, मळके कपडे, तोंडात कायम विमल आणि हसरे पण सतत काहीतरी खोड्या काढायचा विचार करणारे टपोरे डोळे. नेहा तिथ यायची ते इतरांना त्रास द्यायलाच. कोणालातरी डोक्यावर टपली मारणार. कोणालातरी शिव्या देणार. थोडी चौकशी केल्यानंतर कळाल कि तिला वडील नाहीयेत. आई, ती आणि दोन भाऊ, त्यातल्या एकाच लग्न झालेलं. त्याच्यासोबतच अख्ख कुटुंब राहायचं. नेहा आणि तिचा धाकटा भाऊ आई सोबत पहाटे पहाटे कचरा गोळा करायला जायची ती थेट दुपारीच परत यायची. बाहेरची काम झाल्यावर घरची काम पण तिचा पिच्छा सोडायची नाहीत आणि याचा राग ती सगळ्यांवर काढायची.
शाळा तिने खूप पूर्वीच सोडली होती. कारण विचारल्यावर,”सरने इतक्या जोरात कानाखाली मारली कि अजूनबी आवाज घुमतोय.” अस उत्तर मिळाल.
सुरुवातीचे दिवस गेल्यावर अचानक नेहा आमच्या येऊन बसायला लागली. गप्पा मारायला लागली. दिवसेंदिवस आंघोळ न करणारी हि पोरगी इतरांना बघून आवरून यायला लागली. मन लाऊन अभ्यास पण करायला लागली. अत्यंत त्रास देणारी, व्रात्य वाटणारी नेहा खूप मायाळू, सगळ्यावर प्रेम करणारी आणि इतरांची काळजी घेणारी आहे हे लक्षात यायला लागल.
अभ्यासात तर ती हुशार होतीच पण तिला मनापासून नाचायला आवडायचं. मोठी होऊन डान्सर बनणार अस तिने आधीच जाहीर करून टाकलेलं होत. जर आपल्या आधी हि पोरगी सेंटरवर पोहोचली तर असतील-नसतील तेवढ्या सगळ्यांना गोळा करून हि त्यांना गाण्यावर नाचायला शिकवत असायची. अश्यावेळेस एक जण दोन कट्या घेऊन ढोल वाजवत असल्यासारखा जमिनीवर बडवत असायचा आणि तोंडाने आवाज काढत असायचा. कुणीतरी गाण म्हणत असणार, मध्ये नेहा आणि काही आजूबाजूला तर काही मागे असे अगदी व्यवस्थित उभे राहून नाचतायेत अस चित्र हमखास दिसायचं.
नेहाचा धाकटा भाऊ अर्जुन. सतत अस्वच्छ राहत असल्याने इतर मुल त्याच्या जवळ जायची नाहीत. अर्जुन थोडा बोबड बोलायचा, त्यामुळे इतर आपल्याला हसतील ह्या भीतीने ह्या पोराच बोलण आणखीनच कमी झालेलं. नेहाच्यामुळे अर्जुन देखील आनंदघरात यायला लागला होता. पण अजूनही इतरांसोबत मिसळत नव्हता. आमच्यासगळ्याशी बोलायचा पण इतर मुलांसोबत मात्र मिसळत नव्हता. इतर त्याला सोबत घेऊन फिरायचे ते फक्त त्याची टर उडवायलाच. पण एक दिवस जवळच्या तलावावर पोर पोहायला गेलेली असताना अचानक एक जण बुडायला लागला तेव्हा ह्या अर्जुन मागचापुढचा कुठलाही विचार न करता थेट पाण्यात उडी मारली आणि त्याला बाहेर काढला. त्या दिवसापासून अर्जुन सगळ्यांचा हिरो झाला. संध्याकाळी सगळीकडे एकच चर्चा होती. या घटनेनंतर अर्जुनला बराच धीर मिळाला. 
नेहापण हळूहळू स्वच्छ राहायला लागली होती. अभ्यासत रस घेत होती. पण गुटखा खाण मात्र कमी झालेलं नव्हत. याचकाळात संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी आम्ही मुलांच्या फोटोज असलेला एक व्हिडियो बनवत होते. त्याच काम सुरु असल्याने एक दिवस आम्हाला पोहोचायला उशीर झाला. गेल्या-गेल्या जाब  विचारायला ह्या बाई दारात उभ्याच होत्या. खर कारण सांगितल तर म्हणजे तुम्ही खोट बोलताय. मग “जर खर असेल तर?” असा प्रतिप्रश्न केल्यावर एका क्षणात,”जर खर असेल तर उद्यापासून एक पुडी कमी खाईन, प्रोमीस” अस तिने सांगितल. दुसऱ्या दिवशी आम्ही व्हिडियो घेऊन गेल्यवर निघताना नेहा हळूच आमच्याजवळ आली आणि “ताई, आजपासून एक पुडी कमी.” अस सांगून गेली. नेहाच्या गुटखा सोडण्याची ती सुरुवात होती. पुढील काही दिवसात तिने पूर्णपणे गुटखा खाण थांबवल होत.
पूर्वी शाळेत जायला अजिबात तयार नसलेल्या नेहाने आता “तुम्ही असाल त्याच शाळेत जाऊ” अस सांगितल होत, आता तिथून तुम्ही जर शाळेत येऊन सांगितल तर शाळेत जाऊ इथपर्यंत ती आली होती. लिहायला वाचायला यायला लागल्याने तिचा आत्मविश्वास वाढला होता. नेहा पुन्हा एकदा शाळेत जायला तयार होती.
एक दिवस सेंटरवर गेल्यावर नेहा दिसली नाही. तेवढ्यात तिच्या मैत्रिणी पळत आल्या. “सर! नेहा गाव सोडून गेली”. कोणालाही न सांगता इतरांप्रमाणे नेहा आणि तिच्या कुटुंबीयांनी एका रात्रीत गाव सोडल होत. आजही ते कुठे याबद्दल ठोस अशी कुठलीच माहिती आमच्याकडे नाही. ती शाळेत गेली कि नाही हा प्रश्नदेखील आजही अनुत्तरीतच आहे.


ता.क. हा लेख लिहून तसा बराच काळ निघून गेलाय. पण मागील आठवड्यातच सोमवारी सेंटरवर पोहोचलो तर माझ्यासमोर नेहा.....नेहमीच्या सवयीप्रमाणे मला लगेच येऊन बिलगली....गेला काही काळ ते सुरतच्या पुढील कुठल्यातरी गावात होते. तिथे नेहा, अर्जुन आणि तिची आई एका वीट-भट्टीवर काम करत होते पण आता ते जळगावला परत आलेत. कालच अर्जुन भेटला. जवळपास वर्षभरानंतर पुन्हा एकदा त्याला बघितला. पोरगा मोठा झालाय. आता नेहा आणि अर्जुन जळगावलाच राहणार आहेत. गेल्यावर्षभरात नेहाच प्रचंड शैक्षणिक नुकसान झालंय. वाचायची सवय पुरती गेलीये. काही हरकत नाही. पुन्हा एकदा लढायला तयार आहोत. नेहा परत आलीये हेच आमच्यासाठी खूप आहे.

Friday, April 7, 2017

आनंदघर डायरीज....

प्रतीक्षा
प्रतीक्षा वय वर्ष ६, एकदम बारीक. मध्यंतरी तिला म्हणालो,’”अशीच बारीक होत राहिलीस तर काही दिवसांनी गायब होऊन जाशील.” अस काही आपण म्हणालो हि तिच्या नेहमीच्या सवयीने होहोहो करून हसणार आणि “ताई, सर मला उगीच त्रास देता” अशी माझी तक्रार प्रणालीकडे करणार. प्रतीक्षा आणि तिचा ५ वर्षाचा भाऊ, तिच्या आईसोबत पहाटे पहाटे कचरा वेचायला बाहेर पडणार. ते थेट दुपारी परत येणार. मग हि थोडी झोप काढणार आणि संध्याकाळी आनंदघरात येणार. आनंदघराच्या अगदी सुरुवातीपासून येणाऱ्या काही मुला/मुलींपैकी प्रतीक्षा एक.
आनंदघरात आली कि हक्काने येऊन माझ्या मांडीतच बसणार. आल्यापासून निघेपर्यंत नुसती बडबड बडबड. प्रचंड गप्पिष्ट, नुसता टाईमपास. “सरांनी हिला लाडावून ठेवलीये” असा सगळ्यांचा माझ्यावरचा आरोप. पण पोरगी एकदम हुशार, एकपाठी. संध्याकाळी येताना अगदी स्वच्छ आवरून येणार. इतरांसोबत अजिबात मारामारी नाही करणार, शिव्या नाही देणार. शाळेत आजपर्यंत गेलेली नाहीच. पण जायला प्रचंड उत्सुक. शाळेत का जायचंय अस विचारल तर,”गप्पा मारायला.” हे ठरलेल उत्तर.
प्रतीक्षा आणि तिच्याच वयाची रोशनी, हे म्हणजे एकदम भारी समीकरण. नेहमी सोबत असणार. रोशनीला देखील एक लहान भाऊ आणि हे दोघदेखील त्यांच्या आईसोबत प्रतीक्षा आणि तीच कुटुंब जिथे कचरा वेचायला जातात तिथेच जाणार. प्रतीक्षा जेवढी गप्पिष्ट, रोशनी तेवढीच लाजाळू. पण जर ह्या दोघी एकत्र आल्या तर मात्र कोणालाच सोडत नाहीत. या दोघींचे किस्से आमच्याकडे एकदम फेमस.
एक दिवस प्रतीक्षा पोरगी खूप गंभीरपणे प्रणाली कडे आली आणि तीला म्हणाली, “ताई, सरले कधी दारू नको पी देजा. दारू पिली हि माणूस येडा होई जातो.” अस अचानक काय झाल विचारल असता आदल्या दिवशी तिच्या वडिलांनी दारू पिऊन या दोन्ही पोरांना पट्ट्याने मारल होत आणि त्यांच्यासाठी हे रोजचच होत. या छोट्याश्या पोरीची दारू बद्दलची समज थक्क करून सोडणारी होती.
याचनंतर काही दिवसांनी मी बरेच दिवस एका कामानिमित्त जळगावच्या बाहेर गेलो होतो. परत आल्यानंतर पहिल्याच दिवशी हो पोरगी गंभीर चेहऱ्याने माझ्याकडे आली आणि मला म्हणाली,”सर ताईले इतके रोज एकटे सोडून नको जात जा.”
काही दिवसापूर्वी अचानक हिच्या मानेंवर पाठीमागच्या बाजूला गाठी लागल्या. तिने आम्हाला दाखवल्या. तिच्या आईशी याविषयी चर्चा केली. त्यांनी सांगितल कि अश्याच गाठी पूर्वीपण आल्या होत्या पण मग त्या आपोआप नाहीश्या झाल्या. आधीच्या गाठी दुखायच्या नाहीत. यावेळी मात्र त्या दुखत होत्या. आमच्या एका हितचिंतकाने आम्हाला ताबडतोब जळगावातील प्रसिद्ध कॅन्सर तज्ञांशी गाठ घालून दिली. त्यांनी तिला तपासलं. सुरुवातील त्यांना त्या गाठी टीबीच्या वाटत होत्या. मेडिकल चेकउप केल्यानंतर मात्र त्या गाठी सध्या असून, हानिकारक नाहीत असा निष्कर्ष निघाला आणि आमच्या सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.
प्रतीक्षाला गाणी म्हणायला खूप आवडत. सगळी गाणी हिची तोंडपाठ. तिला विचारल तर म्हणजे “मी ड्यॅन्सर होणार.” “पण अग ड्यॅन्सर म्हणजे नाचणारा तुला तर सिंगर म्हणजे गाणार ह्यायचय ना?” तर म्हणे “हो, तेच ते.”
यावर्षी जेव्हा आम्ही सगळ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी पालकांना भेटून बोलत होतो. पण इतरांची प्रतिक्रिया फारशी सकारात्मक नव्हती. पण “पोरींना शाळेत टाकायचंय”  अस सांगणाऱ्या फक्त प्रतीक्षा आणि रोशनीची आईच होत्या. ठरवल्याप्रमाणे आम्ही या दोघींना पहिलीत आणि यांच्या भावांना बालवाडीत दाखल केल. संध्याकाळ पर्यंत प्रतीक्षा आणि रोशनी आता शाळेत जाणार हि बातमी अख्ख्या कॉलोनीत पसरली. पहिल्याच दिवशी अत्यंत झोकात या पोरी शाळेत गेल्या आणि उड्या मारतच परत आल्या. यांना पाहून बाकीचे पालक संध्याकाळीच आम्हाला भेटायला आले आणि “आधी लक्षात नाही आल, पण आपल्यापण पोरींना शाळेत टाकायचं. तुम्हीच सांगा कुठल्या शाळेत टाकू.” अस सांगितल. प्रतीक्षा आणि रोशनीमुळे यावर्षी आम्ही तब्बल १६ मुला/मुलींना शाळेत दाखल करू शकलो,यांपैकी काही जण पहिल्यांदाच शाळेत गेले तर ज्यांनी शाळा सोडली होती ते देखील परत शाळेत जायला तयार झाले.
प्रतीक्षा शाळेत जायला लागल्याचा दुसरा अनपेक्षित फायदा असा झाला कि त्यांचे वडील जे पूर्वी काही कामधंदा न करता फक्त घरी बसून दारू प्यायचे, ते कामाला लागले. संध्याकाळी दारू पिऊन परत येतना दिसणारे तिचे वडील आता घरासाठी भाजी-पाला घेऊन येताना दिसतात, त्यावेळी प्रतीक्षा इतकाच आनंद आम्हाला देखील होतो.

नुकत्याच शाळेत झालेल्या स्नेहसंमेलनात रोशनीने ३ स्पर्धेमध्ये बक्षीस जिंकली. संध्याकाळी उड्या मारतच हि पोरगी तिला मिळालेलं प्रशस्तीपत्रक दाखवायला घेऊन आली होती. आज प्रतीक्षा, समाधान, रोशनी आणि गणेश असे सगळे दररोज शाळेत जातायेत. कचरा गोळा करणारे हात आता शाळेत प्रशस्तीपत्रक गोळा करतायेत.

Hope is a good thing—perhaps the best of things—and no good thing ever dies

Hope is a good thing—perhaps the best of things—and no good thing ever dies. Imagine growing up in a community where you're not allowed ...